राजस्थानचे रजत जलबिंदू - 4

Published on
3 min read

श्री अनुपम मिश्र यांच्या पुस्तकाचे स्वैर भाषांतर

कुई चं तोंड लहान ठेवण्यासाची तीन मोठी कारणं आहेत. वाळूत जमा झालेल्या ओलाव्याने पाण्याचे थेंब अगदी हळूहळू झिरपतात. दिवसभरात एक कुंई फारतर दोन तीन घडे भरू शकतील एवढच पाणी जमा करू शकते कुईच्या तळाशी पाण्याचे प्रमाण इतके कमी असतं, की कुंईचा व्यास मोठा असेल तर पाणी (कमी प्रमाणातलं) जास्तच पसरेल आणि मग ते वर काढणं शक्य होणार नाही. कमी व्यासाच्या कुईंमध्ये हळूहळू पाझरणारं पाणी दोन -चार हात उंची गाठतं. काही ठिकाणी कुईंतील पाणी काढतांना बादलीच्या ऐवजी छोटी चडस (चामड्याची थैली) वापरतात ती ह्याच कारणामुळे.

धातूची बादली पाण्यात पटकन् बुडत नाही... पण जाड कपड्याच्या किंवा चामड्याच्या चडस च्या तोंडाशी लोखंडाचं जड कडं बांधायचं, ती थैली पाण्याला टेकते, वरच्या कड्याचं वजन तिच्यावर पडतं, अशा रीतीने कमी पाण्यात सुध्दा ती व्यवस्थित बुडते. भरल्यानंतर वर उचलतांच चडस आपला पूर्ण आकार धारण करते.

गेल्या काही काळात अशा काही गावांच्या आसपास सडका झाल्या आहेत, ट्रक धावले आहेत. ट्रकच्या फाटलेल्या ड्यूबपासूनही छोटी चडसी बनू लागली आहे.

कुंईच्या व्यासाचा संबंध इथे पडणाऱ्या कडक उन्हाशी सुध्दा आहे. व्यास मोठा असेल तर कुईंतले पाणी जास्त पसरेल. मोठा पृष्ठभाग पाण्याला वाफ बनून उडून जाण्यापासून थांबवू शकणार नाही.

कुंईला आतलं पाणी स्वच्छ राहण्यासाठी, झाकून ठेवण जरूरीचे आहे. छोटं तोंड झाकालया सोपं पडतं. प्रत्येक कुईवर लाकडाचं बनवलेलं झाकण ठेवलेलं आढळेल. कुठे कुठे वाळ्याच्या तरटासारखं गवताबिवताच्या छोट्या फांदुऱ्यांनी बनवलेल्या झाकणांचाही वापर होतो. जिथे आता नवे रस्ते झालेत आणि त्यामुळे नव्या आणि अपरिचित लोकांची ये - जा वाढली आहे, तिथे अमृतासारख्या गोड पाण्याचे रक्षण करणं भागच पडतं. अशा इलाख्यांतून कित्येक कुईच्या झाकणांवर छोटी छोटी कुलुंपही लागायला लागलीत. अशी कुलुपं पाणी वर खेचण्यासाठी लावल्ल्या घिरनी - चक्री यांवरही लावली जातात.

कुई खोल असेल तर पाणी खेचण्यासाठी सोय म्हणून तिच्यावर घिरनी (घिरट) किंवा चक्री (रहाट) लावली जाते. यालाच गरेडी , चरखी किंवा फरेडी असंही म्हणतात. फरेडी लोखंडाच्यादोन कांबीवरही लावली जाते. पण बहुदा ही गुलेल च्या आकाराच्या एका मजबूत दांड्याला आरपार छेड बनवून लावली जाते. तिला ओडाक म्हणतात. ओडाक किंवा चक्री (चरखी) यांच्याशिवाय इतक्या खोल आणि निरूंद कुईतून पाणी काढणं हे फार कठीण काम बनू शकतं. ओडाक किंवा चरखी, चडसीला इकडे - तिकडे न आपटतां सरळ वरती आणते, त्यामुळे पाणी मध्येच हिंदकळून पडत नाही. वजन उचलण्यात तर त्यामुळे सोयच होते.

खडीच्या दगडांची पट्टी एका मोठ्या भागातून जाते, त्यामुळे त्या पुऱ्या भागात एकापुढे एक अशा कुई बनत जातात. अशा भागात एखाद्या मोठ्या, स्वच्छ मोकळ्या मैदानात तीस - चाळीस कुंई असू शकतात. प्रत्येक घरी एक कुंई, कुटुंब मोठं असेल तर एकाहून अधिकही.

व्यक्तिगत आणि सार्वजनिक संपत्तीचं विभाजन करणारी मोठी सीमारेषा कुंई च्या बाबतीत एकास विचित्र प्रकारे जणू पुसली जाते. प्रत्येकाची आपापली कुंई असते. ती बनविण्याचा व तिचं पाणी वापरण्याचा हक्क हा त्याचा स्वत:चा हक्क असतो. पण कुंई ज्या क्षेत्रात बनते, ती जागा मात्र गांव - समाजाची सार्वजनिक असते. त्या जागी पडणारा पाऊसच मागाहून वर्षभर ओलाव्याच्या रूपात सुरक्षित राहील आणि त्याच ओलाव्यामुळे वर्षभर पुढे कुंईमध्ये पाणी राहील. ओलाव्याचे प्रमाण तिथे पडून गेलेल्या पावसावरूनच ठरलं आहे. आता त्या भागात बांधल्या जाणाऱ्या प्रत्येक कुंई चा अर्थ म्हणजे पहिल्यापासून ठरलेल्या ओलाव्याची आणखी वाटणी. त्यामुळे खाजगीरीत्या बनलेल्या असल्या, तरीही सार्वजनिक क्षेत्रांत बनणाऱ्या प्रत्येक कुंईवर गांवसमाजाचा अंकुश असतो. त्यामुळे फारच गरज पडेल, तेव्हाच गांवसमाज नवी कुंई खोदण्यासाठी आपली संमती देतो.

प्रत्येक दिवशी एक सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीची चिरपरिचित कहाणीच कुंई जशीकांही प्रत्यक्षात जमिनीवर आणते. तिच्यातून दिवसांकाठी, बस्, दोन - तीन घडे गोड पाणी काढलं जावू शकतं. त्यामुळे बहुदा पुरा गांव गुरे चरून परतण्याच्या वेळी ( गो - धूली बेला) कुंईवर येतो, तेव्हा जशी जत्रा भरते, गांवाला लागून असलेल्या मैदानातल्या तीस - चाळीस कुंईवरच्या रहाटांचे आवाज, गायरानातून परतणाऱ्या गुरांच्या गळ्यांतल्या घंटांच्या आणि हंबरण्याच्या आवाजात मिसळून जातात. दोन - तीन हंडे भरून झाले की डोल आणि दोऱ्या गुंडाळून घेतल्या जातात. कुंईची झाकणे पुन्हा नीट लावली जातात. आता रात्रभर आणि पुढचा दिवसभर कुंईना आराम मिळेल.

वाळूखाली सर्वच ठिकाणी खडीच्या पत्थराची पट्टी नाही आहे, त्यामुळे संपूर्ण राजस्थानात कुंईसुध्दा सगळीकडे मिळणार नाही. चुरू, बिकानेर, जैसलमेर आणि बाडमेरच्या मोठ्या भागातून ही पट्टी जाते. त्यामुळे तिथे गांवागांवात कितीतरी कुंई आहेत. जैसलमेर जिल्ह्यातील 'खडेरोंकी ढाणी' ह्या एका गावात तर 'एकशेवीस कुंई' होत्या. लोक ह्या भागाला 'सहाविशी' (छहबीसी - म्हणजे सहापटीने वीस) म्हणून ओळखतात. कुठे कुठे ह्यांना 'पार' असंही म्हणतात. जैसलमेर आणि बाडमेर मधली कित्येक गांवे ह्या पारांमुळेच सुखी - समृध्द आहेत आणि म्हणूनच ह्या गावाची नांवेही ह्या पारां वरूनच दिलेली आहेत. जसे 'जानरे आलो पार' आणि 'सिरगु आलो पार.'

सिरगु आलो पार :

थांबलेलं पाणी निर्मळ

सौ. प्रज्ञा सरखोत - मो : 07738240836

संबंधित कहानियां

No stories found.
India Water Portal - Hindi
hindi.indiawaterportal.org