देशोदेशीचे पाणी
पाण्याचा थेंबनथेंब अडविण्यासाठी तसेच सर्व अशुध्द सांडपाणी व मैलापाणी हे त्या शुध्द पाण्यात मिसळू नये म्हणून १० वर्षांचा एक मास्टर प्लॅन बनविण्यात आला. सर्व सांडपाणी व मैलापाणी गोळा करण्यासाठी स्वतंत्र सुअरलाईन्स टाकण्यात आल्या. फक्त पावसाचे पाणी - घरांच्या छतावर पडणारे, मोकळ्या जागांवर पडणारे, रस्त्यांवर पडणारे इ. हे उघड्या मार्गिकांमधून वाहून नेऊन वर उल्लेखलेल्या तलावांमध्ये गोळा करण्यात येऊ लागले. ह्याला नागरी पाणी म्हणू लागले.
सिंगापूर हा दक्षिणपूर्व आशियातून सर्वबाजूंनी समुद्राने वेढलेला एक लहानसा देश. केवळ ६९२.७ चौ.मी क्षेत्रफळ असलेला. म्हणजे अधिक सोप्या भाषेत सांगावयाचे तर धुळ्यासारख्या छोट्या जिल्ह्यापेक्षाही लहान. लोकसंख्या केवळ ४.५० लाख म्हणजे धुळ्यासारख्या शहराएवढीच. पण किर्ती मात्र महान आहे.
सिंगापूर म्हणजे एक मोठे आणि अवतीभोवती ७-८ लहान बेटे असलेला देश. चारही दिशांनी समुद्र असल्याने बाराही महिने पाऊस पडतो. सरासरी २३४३ मि.मी एवढा. पण तरीही देशात प्रचंड पाणी टंचाई आहे. स्वत:ची पाण्याची गरज भागविता यावी म्हणून त्यांना मलेशियाकडून पाणी विकत घ्यावे लागते. हा सगळाच प्रश्न जरा तपशीलवार समजावून घ्यायला हवा. तरच सिंगापूरच्या प्रयत्नांचे महत्व आणि यश म्हणजे काय हे लक्षात येऊ शकेल.
पुन्हा सिंगापूरबद्दल. सिंगापूर हा मूलत: सपाट भूप्रदेश, जास्तीत जास्त उंची ही समुद्रसपाटीपेक्षा ६५ मी. उंच एवढीच. बेट हे लांबट, चिंचोळे त्यातील सगळ्यात मोठी नदी ही सिंगापूर. तिची लांबी १५ कि.मी, दुसरी नदी ही कालांग ती १० कि.मी. लांब. सपाट चिंचोळे बेट असल्याने पडणारा पाऊस हा वेगाने समुद्रात वाहून जातो. पुन्हा शिल्लक रहाते ती पाणी टंचाई !
भूगर्भाचा विचार करावयाचा तर तो मुख्यत्वे अग्नीजन्य खडकाचा बनलेला प.सिंगापूरचा काही भाग हा सँडस्टोन व मटस्टोन यांचा जलजन्य खडकाचा. तर उत्तरपूर्व सिंगापूर हा रूपांतरीत खडकाचा. तेथे Palau Tekong आणि Quartz हे मुख्य प्रकार. हे सगळे इतक्या तपशीलात सांगण्याचा हेतू एवढाच ही पश्चिम सिंगापूरचा जलजन्य खडकाचा काही भूभाग सोडला तर अन्यत्र खडकात पाणी मुरत नाही. खोलवर खोदण्याचा प्रयत्न केला तर समुद्राचे खारट पाणी आत शिरते. त्यामुळे तो पर्यायही बाद. सिंगापूरला स्वत:ची जंगले नाहीत. फारशी शेती नाही. सपाट जमिनीमुळे नैसर्गिक तलाव नाहीत. कृत्रिमपणे तलाव निर्माण करावेत एवढी जमीन नाही. थोडक्यात म्हणजे सर्वच परिस्थिती ही विपरीत , विरोधात !
१९५५ पर्यंत केवळ एक लाखाचे आसपास लोकसंख्या असताना त्यांचे भागत होते. पण ८० च्या दशकापासून लोकसंख्या वाढू लागली, उद्योगधंदे येऊ लागले, पाण्याची मागणी वाढू लागली. आणि ती गरज भागविण्यासाठी पाणी आयात केले पाहिजे हे देशाच्या नेतृत्वाला समजले. १९६१ साली त्यांनी पाणी आयात करण्याचा पहिला करार केला ते २०११ मध्ये संपला (काही मुदतवाढीचा लाभ घेऊन २०२० पर्यंत ओढता येईल) दुसरा करार १९६२ मध्ये केला तो २०६१ पर्यंत चालेल. मात्र त्यानंतर त्यांचे नुतनीकरण करावयाची वेळ आली तर खूप जास्त पैसे मोजावे लागतील हे त्या देशाच्या नेतृत्वाच्या लक्षात आले. त्यांनी स्वत:च्या पाण्याची गरज स्वत:लाच भागविता यावी ह्या दृष्टीने धोरणे आखायला आणि त्याची अंमलबजावणी करायला सुरूवात केली. आणि त्यातून २०११ संपतांनाच तो देश स्वत:ची गरज भागवू शकेल एवढे पाणी निर्माण करू लागला आहे आणि मुख्यत्वे तेवढ्यावर त्यांचे समाधान नाही. २०६२ सालची पाण्याची जी मागणी असू शकेल ती संभाव्य मागणी पूर्ण करता यावी ह्यासाठी आताच पुरेसे पाणी उपलब्ध करावे आणि त्याबाबतीत स्वयंपूर्ण व्हावे असा त्यांचा प्रयत्न आहे. अशा ह्या दूरदर्शी नेतृत्व असलेल्या देशाच्या पाण्याबद्दलचा विचार आणि त्यानुसार केलेला आचार हा समजावून घेऊ या.
पाण्याची गरज :
न्यू वॉटर :
१. पावसापासून मिळणारे पाणी :
२. आयात पाणी :
३. समुद्राच्या पाण्याचे शुध्दीकरण (नि:क्षारीकरण) :
४. न्यू वॉटर (पाण्याचा पुनर्वापराचा यशस्वी प्रयोग) :
लोकसहभागासाठी जागृती :
देशोदेशीचे पाणी इस स्टोरी को एक जगह पढ़ने के लिये नीचे दिये गये लिंक पर क्लिक करें | |
1 | |
2 | |
3 |
सम्पर्क
मुकुंद धाराशीवकर, धुळे -(दू : ०२५८२ २३६९८७)